जल, जंगल आणि जमीन हक्कांसाठी लढणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे तसेच आदिवासी समाजात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे महान क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त जळगाव शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दि. ९ जून सकाळी ११ वाजता जीएम फाउंडेशन, भाजप कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्य, त्यांच्या क्रांतिकारी संघर्षाची माहिती आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी जिल्हा पदाधिकारी राहुल वाघ, नितीन इंगळे, उदयजी भालेराव, राजेंद्र मराठे, मिलिंद चौधरी, मनोज भांडारकर, दीपक कोळी, नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, संजय नारखेडे, महेश चौधरी, नितीन पाटील, जितेंद्र चव्हाण, महेश कापुरे, मुकेश कुकरेजा, विठ्ठल पाटील, तुषार सूर्यवंशी, हर्षल सोनवणे, भूषण काकडे, किरण भोई, युवराज सपकाळे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनाचा गौरव करत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्पही करण्यात आला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
