‘बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी ! राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती चे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची मागणी 

बकरी ईददरम्यान सोसायट्यांमध्ये होणाऱ्या कथित अवैध पशूहत्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली.

बकरी ईददरम्यान रक्तमिश्रित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असल्याचा दावा करत हिंदु जनजागृती समितीने प्रशासनाला आवाहन केले आहे.

 सोसायटींमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. असे असूनही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांतील सोसायट्यांमध्ये बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे. बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे. याविषयी श्री. रमेश शिंदे यांनी मंत्रालयात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली.

     यावेळी रमेश शिंदे म्हणाले, ‘‘बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये बकर्‍या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.’’

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची आवई उठवणारे आता कुठे आहेत ?

     होळी, गणेशोत्सव आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तसेच पुरोगामी मंडळी प्रदूषण होत असल्याची आवई उठवून ते रोखण्याचे आवाहन करण्यासाठी पुढे येतात. बकरी ईदनिमित्त पशूंच्या अवैध हत्या करून रक्तमिश्रित पाण्यामुळे होत असलेल्या रोगाच्या प्रादूर्भावाविषयी ही मंडळी का पुढे येत नाहीत ? असा प्रश्न या वेळी रमेश शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!