सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी मेहरगावातील नागरिकांना ओटीपी, पिन, पासवर्ड आणि बँकिंग माहिती शेअर न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील मेहरगाव येथे क्विक हिल फाउंडेशन (QHF) आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा विषयावर जनजागृतीपर प्रभावी उपक्रम घेण्यात आली. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान नागरिकांना सायबर फ्रॉडचे विविध प्रकार तसेच फसवणूक करणाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन पद्धतींची माहिती देण्यात आली. ओटीपी , पिन, पासवर्ड , बँकिंगविषयक माहिती अथवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच संशयास्पद फोन कॉल, एसएमएस आणि ऑनलाइन संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमात तनिषा महाजन, तेजस्विनी पाटील यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. धनश्री पाटील यांनी सहाय्यक म्हणून उपक्रमात सहकार्य केले.
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रभावी उपक्रमच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
