मेहरूण तलाव आटू लागला; नागरिकांमध्ये चिंता वाढली

जळगाव शहरातील प्रमुख जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावाची पाणीपातळी झपाट्याने घटत असून तलावाच्या काही भागांमध्ये तळ दिसू लागला आहे. वाढते तापमान, पावसाचा विलंब आणि नैसर्गिक पुनर्भरणातील घट यामुळे भविष्यात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त होत असून तलाव संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.

जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.

 शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण तलाव सध्या पाणीपातळी घटल्यामुळे आटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाळा संपल्यानंतरही पावसाला उशीर होत असल्याने आणि वाढत्या तापमानामुळे तलावातील पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये या परिस्थितीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मेहरूण तलाव हा जळगाव शहरातील महत्त्वाचा नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोत मानला जातो. मात्र सध्या तलावाच्या काही भागांमध्ये तळ दिसू लागल्याने पाणी झपाट्याने कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे.वाढते तापमान आणि बाष्पीभवन,पावसाच्या आगमनात विलंब,पाण्याचा वाढता वापर आणि अपव्यय,तलावाच्या नैसर्गिक पुनर्भरणात घट हि तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीसाठी कारणे जबाबदार असू शकतात. तलाव आटू लागल्याने परिसरातील नागरिकांनी पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पाणीपुरवठ्यावर ताण असताना ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तलाव संवर्धन, गाळ काढणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी ही जळगाव शहरासाठी धोक्याची घंटा मानली जात असून, वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!