महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरांचा निर्णय :पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरांच्या निर्णयानुसार पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांची विश्वस्त म्हणून मान्यता कायम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदाबाबत महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरांचा निर्णय. प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने निकाल लागल्याचा दावा.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीइएस ) संदर्भातील प्रदीर्घ कायदेशीर वादाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निर्णय दिल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून मान्यता कायम करण्यात आली आहे.

या प्रकरणात गेल्या अनेक काळापासून कायदेशीर संघर्ष सुरू होता. ॲड. प्रकाश आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी होऊ नयेत, यासाठी एस. पी. गायकवाड यांच्यासह अनेकांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले आणि त्यासाठी अनेक आघाड्याही उभारल्या. मात्र, ही संपूर्ण लढाई न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रियेतून पुढे गेली आणि लढा जिंकला.विविध आक्षेप आणि वादांनंतर झालेल्या सुनावणीत चॅरिटी कमिशनरांनी संबंधित बाबींवर निर्णय दिला आहे.

या निर्णयानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे हे दोघेही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी म्हणून कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या निर्णयाचे समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून, हा न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीच्या वारशाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!