ठाण्यातील ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे यंदा आयोजन; सकाळी ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापासून परेडला सुरुवात होणार.
स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला अनोखा रंग देण्यासाठी ठाण्यात यंदाही ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉग्स वर्ल्ड इंडिया’च्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापासून या पेट परेडला सुरुवात होणार असून, डॉग्स वर्ल्ड इंडिया येथे तिचा समारोप होईल.
देशभक्तीची भावना आणि पाळीव प्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता यांचा अनोखा संगम या उपक्रमातून पाहायला मिळणार आहे.
ठाणे शहरात उपवन महोत्सव, पेट फेस्ट यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात येणारी ही पेट परेड नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या पेट परेडची सुरुवात २०२२ मध्ये करण्यात आली. पहिल्याच वर्षी दोनशेहून अधिक पाळीव प्राणी पालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ठाण्यातील पाळीव प्राणीप्रेमींसाठी ही परेड वार्षिक आकर्षण ठरली आहे.
यंदाच्या परेडमध्ये विविध जातींचे श्वान, मांजरी तसेच इतर पाळीव प्राणी आपल्या मालकांसोबत सहभागी होणार आहेत. अनेक पाळीव प्राण्यांना तिरंग्याच्या रंगातील आकर्षक पोशाख परिधान करण्यात येणार आहे. काही सहभागी हातात तिरंगा घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत परेडमध्ये सहभागी होतील. त्यामुळे परेडच्या मार्गावर देशभक्तीच्या वातावरणासोबतच पाळीव प्राण्यांच्या आकर्षक वेशभूषेचेही दर्शन नागरिकांना घडणार आहे.
डॉ. घाणेकर नाट्यगृह ते डॉग्स वर्ल्ड इंडिया
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (पश्चिम) येथून सकाळी ८ वाजता पेट परेडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर परेड डॉग्स वर्ल्ड इंडिया येथे पोहोचणार आहे. पाळीव प्राण्यांचे पालक तसेच प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव, देशभक्तीची भावना आणि प्राण्यांवरील प्रेम यांचा सुंदर मिलाफ घडवणारी ही पेट परेड ठाणेकरांसाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे खास आकर्षण ठरणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
